Posts

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; बुधवारी होणार निर्णय

Image
मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील दोन दिवस कोठडीतच काढावे लागणार आहेत. न्यायालयात निकालाचं वाचन पूर्ण न झाल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार असून निर्णय देण्यात येणार आहे. वेळे अभावी न्यायालयाला आज निर्णय देता आला नाही. तसेच उद्या ईदमुळे न्यालयाच्या कामकाजाला सुट्टी आहे. त्यामुळे पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून रवी राणा तळोजा कारागृहात तर नवनीत राणा अर्थररोड कारागृहात आहेत. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयात अंतिम निर्णयाचे वाचन सुरु होते. परंतु कामकाजाची वेळ संपल्यामुळे निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे पुढील २ दि...

नाकावरून रुमाल फिरवत अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल

Image
मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांची नक्कल करत त्यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीसुद्धा राज ठाकरेंनी नक्कल केली आहे. आता अजित पवार यांनीच राज ठाकरेंची नक्कल करुन टोला लगावला आहे. राज ठाकरेंसारखेच अजित पवारांनी नाकावरुन रुमाल फिरवत त्यांच्या सभेतील वाक्य म्हटलं आहे. औरंगाबादमधील सभेला महत्त्व द्यायचं कारण नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नक्कल केली आहे. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा जातीयवादाचा आरोप केला आहे. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंच्या सभेला महत्त्व द्यायचं कारण नाही. पूर्वीचीच कॅसेट त्यांनी लावली आहे. शरद पवार जातीयवादी आहेत की नाही हे नाशिककरांना चांगले माहिती आहे. तसेच राजू शेट्टी, रामदास आठवले आणि यांनी सांगितले आहे की, शरद पवार जातीयवादी नाहीत. पवारांची राजकीय प्रवास तुमच्यासमोर आहे. एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्तव द्यायचे काय कारण असा प्रश्न अ...

'उद्या ईद आहे', असं सांगत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं महत्वाचे आवाहन

Image
मुंबई - सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या जाहीर सभेमध्ये केलं. तीन तारखेच्या अल्टीमेटमनंतर दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिकाही राज यांनी यासभेमध्ये जाहीर केली. मात्र आता ईदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना एक आवाहन केलं असून ईदच्या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या आरत्यांचं आयोजन करु नका असं सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या एका आवाहनामध्ये ईदच्या दिवशी मुस्लिमांना त्यांचा सण आनंदाने साजरा करु द्या असं म्हटलंय. “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या (औरंगाबादच्या) सभेमध्ये त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लीम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरवल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका,” असं राज म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत ...

नवाब मलिकांची प्रकृती खालावली; जेजे रुग्णालयात उपचार सुरू

Image
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून गेल्या तीन दिवसांपासून जे जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नवाब मलिक यांच्या वकिलाने कोर्टात सोमवारी ही माहिती दिली. नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय घरचं जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं समोर आलं. नवाब मलिक खूप आजारी असल्याचं सांगत कुशल यांनी कोर्टाकडे त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली. विशेष न्यायमूर्ती आर एन रोकडे यांनी तुरुंग प्रशासनाने नवाब मलिकांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती न दिल्याने तसंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याने काळजी व्यक्त केली. यानंतर कोर्टाने नवाब मलिकांच्या प्रकृतीविषयी तसंच तिथेच त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात का यासंबंधी रुग्णालयाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. ५ मे पर्यंत हा अहवाल सादर करायचा आहे. नवाब मलिकांना वैद्यकीय जा...

काळजी घ्या! देशात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला

Image
नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ३ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,१५७ नवे रुग्ण आढळून आले. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १९,५०० वर पोहोचली आहे. दिवसभरात २,७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, आतापर्यंत लसीचे १८९ कोटी २३ लाख, ९८ हजार ३४७ डोस देण्यात आले आहेत. देशात गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूसंख्या कमी आहे. देशात २५ एप्रिल ते १ दरम्यान २२,२०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधीच्या आठवड्यात १५,८०० रुग्णांची नोंद झाली होती. याचाच अर्थ गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येत दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्येचे प्रमाण ६८ टक्के आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीतील रुग्णसंख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यात ९,६८४ रुग्णांची नोंद झाली होती. याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत दिल्लीतील रुग्णसंख्येचे प्रमाण ५३ टक्क्यांनी अधिक आहे. याआधीच्या आठवड्यात दिल्लीत ६,३२६...

काहिलीपासून सुटका होणार? उद्या - परवा वादळी वाऱ्याची शक्यता

Image
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा अधिक जाणवू लागला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळिशी पार गेले आहे. दरम्यान आता मे महिन्यात तरी या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल अशी सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची सुद्धा आशा आहे. १० जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या 3 आणि परवा 4 मे रोजी विजांच्या कडकडाटासह व गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस राज्यातल्या काही भागांमध्ये होऊ शकतो. तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग सुमारे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाकडून कळवण्यात आली आहे. तर 3 मे 2022 रोजी पर्यंत विदर्भ मध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आज दिनांक 2 मे रोजी चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून या भागाला भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे...

कायदेशीर बाबी जाणून घेऊन कारवाई करू, राज ठाकरेंना गृहमंत्र्यांचा इशारा

Image
मुंबई - औरंगाबादमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोग्यां संदर्भात अल्टिमेटम दिला आहे. ईद नंतर भोंगे उतरले नाहीतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणू असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र या भाषणानंतर राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना आम्ही कायदेशीर मतं जाणून घेऊन कारवाई करु अशी माहिती दिली आहे. देशात जाणुनबुजून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. तसंच उद्या ईदच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार असून यावेळी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. “राज ठाकरेंच्या भाषणात फक्त भोंगे, शरद पवारांवरील टीका आणि त्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्यं मला पहायला मिळालं,” अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आम्ही यासंदर्भात उद्या मुंबईला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न आहे. अंतिम निर्णय उद्या घेतला जाईल”...