राजापूरच्या वाकेडघाटीत अपघातात ५ जणांचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळच्या वाकेडघाटीत मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी गाडी आणि गोव्याकडे जाणार्या इको कार ट्रॅव्हलची समोरासमोर टक्कर झाली. त्यात इको कारचा चेंदामेंदा झाला असून या कारमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत अाहे. अपघाताचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणेशोत्सव असल्याने अनेक चाकरमानी कोकणाकडे रवाना झाले आहेत. मात्र आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
Comments
Post a Comment